नवी दिल्ली : जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय संघातील ४८ स्पर्धकांना नवी दिल्ली येथे झालेल्या एका विशेष सोहळ्यात निरोप देण्यात आला. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाने (एनएसडीसी) कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय यांच्या नेतृत्वाखाली या सोहळ्याचे आयोजन केले होते. या स्पर्धेत भाग घेणारा भारताचा संघ सर्वांत मोठा संघ आहे. २२ ते २७ ऑगस्टदरम्यान रशियातील कझान येथे ही स्पर्धा होणार आहे. यासाठी ६० देशांतून १५०० हून अधिक स्पर्धक विविध ५६ कौशल्य स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत.